नाशिक जिल्ह्यात टँकर्सची शंभरीकडे वाटचाल

जिल्ह्यात टँकर्सची शंभरीकडे वाटचाल
जिल्ह्यात टँकर्सची शंभरीकडे वाटचाल

नाशिक : मुंबईमध्ये माॅन्सूनचे आगमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रहिवाशांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील आणखी १९ गावे आणि ७५ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १८ टँकर्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविण्यासाठी धावणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.

जिल्हावासीयांनी यंदा तप्त उन्हाच्या झळांचा सामना केला. उन्हाची दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे उपलब्ध स्राेतही आटू लागले आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकर्सची मागणी होऊ लागली. ७७ टँकरद्वारे २६८ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू होता. आणखी ९२ गावे आणि वाड्यांसाठी १८ टँकर्सला प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ होणार आहे. बागलाण, येवल्यात सर्वाधिक झळ

येवला, बागलाण आणि सिन्नर तालुक्यात टंचाईची सर्वाधिक झळ सहन करावी लागत आहे. या तीन तालुक्यांमध्ये ५२ टँकर सुरू असून आणखी दोन टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मालेगाव व नांदगावमध्ये देखील प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १०३ गावे आणि १६५ वाड्यांसाठी ७७ टँकर्सद्वारे दररोजच्या २५७ फेऱ्या होत आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या गावांसाठी दोन दिवसांत १८ टँकर सुरू होणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com