चटका वाढला

चटका वाढला
चटका वाढला

पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांची वाढ झाली आहे. सांताक्रुज आणि नगर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावामुळे आज (ता.८) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात सातत्याने सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंदले जात आहे. मॉन्सून राज्याचा निरोप घेतल्यांनतर दोन दिवस मुख्यत: कोरडे हवामान असल्याने कोकणातील तापमानात सर्वाधिक वाढ झाली आहे. सांताक्रुझबरोबर कुलाबा, रत्नागिरी, डहाणू येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले आहे. नगर, जळगाव, सोलापूर, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, येथेही पारा ३६ अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश, मराठवाडा ३ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास आहे.  अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, आज (ता. ८) त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचे संकेत आहे. रविवारी दुपारी ही प्रणाली ओमानच्या सलालाह पासून १३४० किलोमीटर, येमेनच्या सोकोट्रा बेटापासून १२५० किलोमीटर अग्नेय दिशेला, तर मिनिकॉय बेटांच्या वायव्येकडे ९४० किलोमीटर समुद्रात घोंगावत होती. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली अाहे. तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, मंगळवारपर्यंत (ता. ९) या भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही उत्तर अंदमान समुद्रातही रविवारी (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे.   रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.१, नगर ३७.२, जळगाव ३६.२, कोल्हापूर ३३.०, महाबळेश्‍वर २६.३, मालेगाव ३५.६, नाशिक ३३.३, सांगली ३३.४, सातारा ३०.६, सोलापूर ३६.०, सांताक्रुझ ३७.२, अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३६.४, डहाणू ३६.३, आैरंगाबाद ३४.५, परभणी ३५.४, नांदेड ३४.०, बीड ३६.४, अकोला ३६.७, अमरावती ३५.८, बुलडाणा ३२.५, ब्रह्मपुरी ३६.१, चंद्रपूर ३५.८, गोंदिया ३४.०, नागपूर ३५.१, वर्धा ३५.०, यवतमाळ ३५.०. मॉन्सून देशातून परतणार नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) आज (ता. ८) देशातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून शनिवारी (ता.६) मॉन्सून परतला आहे. आजपासून दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांत ईशान्य मॉन्सून सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com