तिसंगी सोनके तलावात पाणी सोडण्यासाठी आंदोलन

तिसंगी सोनके तलावात  पाणी सोडण्यासाठी आंदोलन
तिसंगी सोनके तलावात पाणी सोडण्यासाठी आंदोलन

तिसंगी, जि. सोलापूर : नीरा-भाटघर धरणाचे पाणी तिसंगी-सोनके तलावात सोडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या गेटवर शासनाचा निषेध करीत पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पण प्रशासकीय यंत्रणा अद्यापही हललेली नाही. आंदोलनकर्त्या तिघांपैकी दोघा आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही ते आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, सांगोल्याचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतः आंदोलनाला भेट देऊन तिथेच बसण्याचा इशारा दिला आहे.

पावसाळी हंगामात यंदा नीरा-भाटघर धरण १०० टक्के भरल्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणी या धरणाखालील तलावात सोडणे अपेक्षित होते. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाव भरून न घेता हे पाणी भीमा नदीत सोडून दिले. पंढरपूर तालुक्‍यातील तिसंगी सोनके हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. नीरा-भटघरच्या पाणीवाटपात या तलावातील पाण्याचा प्रामुख्याने समावेश असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन काळजीपूर्वक केले नाही. या तलावातील पाण्यावर केवळ शेती नाहीतर ११ गावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

तलावात पाणी सोडावे, यासाठी आमदार भारत भालके यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले, मात्र पाणी सोडले नाही. या भागातील लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने पाणी सोडण्याची गरज असून अन्यथा शेतकऱ्यांनाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. प्रशासनाने अद्यापही काहीच हालचाल न केल्याने आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. त्यातच संजय कारंडे, अशोक पवार, विजय पवार या आंदोलकांची तब्येत खालावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com