मुंबईत आज संविधान बचाव रॅली

मुंबईत आज संविधान बचाव रॅली
मुंबईत आज संविधान बचाव रॅली

मुंबई : देशात सध्याची परिस्थिती पाहता संविधान वाचविण्यासाठी प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) मुंबईत सर्वपक्षीय संविधान बचाव रॅली काढली जाणार आहे. या आंदोलनात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, जनता दलाचे नेते शरद यादव, तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया, अशी ही सर्वपक्षीय रॅली निघणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे मूक धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे. या रॅलीत सर्वपक्षीय राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सहभाग असणार आहे. या संदर्भात माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी म्हणाले, भाजपकडून दररोज वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. देशातील सामाजिक सलोखा बिघडलेला असून, अनेक ठिकाणी जातीय दंगली घडविल्या जात आहेत. यामधूनच राजकीय पोळी भाजण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे राज्यघटनेवरील विश्वासाला कुठे तरी तडा चाललेला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील घटनादेखील ताजीच आहे. न्यायालयीन प्रक्रियेतदेखील राजकीय नेते हस्तक्षेप करीत असतील, तर हे गंभीर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नदेखील गंभीर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. शेतमालाचे दर पाडले जात आहेत. कोणत्याही पिकाला हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचादेखील प्रचंड असंतोष निर्माण झाले आहे. त्यामुळे हे सर्व थांबविण्यासाठी सर्वपक्षीय अराजकीय संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे खासदार शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com