देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी

देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी

नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी लाखो लोकांचे आदरणीय असे व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. अटलजी कायम आमच्या स्मरणात राहतील'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर वाहिली. यामध्ये राहुल गांधींनी ट्विट केले, की ''अटलजींच्या निधनाने आज देशाने महान पुत्र गमावला आहे. त्यांनी देशातील अनेक लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. मी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतो. अटलजी कायम आमच्या स्मरणात राहतील''.   

Today India lost a great son. Former PM, Atal Bihari Vajpayee ji, was loved and respected by millions. My condolences to his family & all his admirers. We will miss him.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com