स्वाभिमानी एक्सप्रेस भरकटली; तब्बल १५० किलोमीटर चुकीचा प्रवास
स्वाभिमानी एक्सप्रेस भरकटली; तब्बल १५० किलोमीटर चुकीचा प्रवास

स्वाभिमानी एक्सप्रेस भरकटली; तब्बल १५० किलोमीटर चुकीचा प्रवास

बानमोर मध्यप्रदेश: नवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी शेतकरी घेऊन  खास गेलेली स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली. नियोजित मार्गाऐवजी भलत्याच मार्गावर रेल्वे गेल्याने रेल्वेचा गलथान पणा सामोरा आला. सकाळी ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी  हाताला येईल त्या वस्तूची फेकफेकी करून निषेध वयक्त केला. रेल्वेसमोर आडवे होऊन संतप्त प्रतिक्रिया व्ययक्त केल्या.  दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या साठी खास रेल्वे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने गेली होती. येताना मथुरा कोटाटा मार्गे कल्याण तेथून पुणे असा मार्ग होता. मध्यरात्री मथुरेतून रेल्वे भरकटली. ती परत आग्र्या कडे आली. पहाटे चार वाजता चहासाठी आचाऱ्याने स्टेशन कोणते आहे हे पाहिल्या नंतर चुकीच्या सिग्नल मुळे रेल्वे 160 किलोमीटर मार्ग बदलून आल्याचे लक्षात आले. शेतकऱ्यांनी स्टेशन मास्टर ला विचारताच तुम्ही इकडे कुठे आलात असा उलटा प्रश्न शेतकऱ्यांना विचारला. रेल्वे काय आम्ही चालवतोय काय असे सांगत शेतकऱ्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. दोन तास गोंधळ झाल्या नंतर गाडी झाशी कडे रवाना झाली. खासदार राजू शेट्टी यांनी या बाबत रेल्वेमंत्रालययकडे तक्रार केली आहे.  या रेल्वेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी ही होत्या. आम्हाला परतीच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप झाल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सागर संभू शेटे यांनी ऍग्रोवन शी बोलताना दिली खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com