तीन जिल्ह्यांत एक लाख ३६ हजार क्विंटल तूर खरेदी

तूर खरेदी
तूर खरेदी

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६२४ क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली असून हरभरा खरेदीला अजूनही गती आलेली नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रावरून तुरीची खरेदी करण्यात आली. या पाच केंद्रावरून आजवर २२७३ शेतकऱ्यांकडून २० हजार ९२५ क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात हरभऱ्याचीही पाच खरेदी केंद्र मंजूर करण्यात आली असून त्यापैकी गंगापूर, औरंगाबाद व पैठण येथे हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. आणखी दोन खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
उस्मानाबाद जिल्ह्यात ७ हजार ६६० शेतकऱ्यांकडून ९१ हजार क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. शिवाय ३९० शेतकऱ्यांकडून ६०५० क्‍विंटल हरभऱ्याचीही खरेदी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवरून २ हजार ७२८ शेतकऱ्यांकडून २४ हजार ६९९ क्‍विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.
 
जालना जिल्ह्यात हरभऱ्याचे एकच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जालन्यातील या एकमेव खरेदी केंद्रावरून २० क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. 
संपूर्ण मराठवाड्यात हमीभावाने तूर व हरभरा खरेदीत साठवणुकीसाठी गोदामांचा मुद्दा कळीचा बनला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात हमीभावाने जवळपास २० ते २२ हजार क्‍विंटल तूर खरेदी करण्यात आली. परंतु, ती अजूनही गोदामात साठवणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत चुकारे देण्यातही अडथळा निर्माण होतो आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com