मराठवाड्यात वीस कारखान्यांनी केले २१ लाख टन गाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय औरंगाबाद अंतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यांत वीस कारखान्यांनी यंदा गाळपास सुरवात केली आहे. या कारखान्यांना १५ डिसेंबरअखेरपर्यंत  २१ लाख ६९ हजार १६९.१६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यातून १७ लाख ३५ हजार ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील बारामती ॲग्रो, संभाजी राजे, व मुक्‍तेश्वर शुगर्स या तीन खासगी साखर कारखान्यांनी यंदा नोव्हेंबरमध्ये ऊस गाळपास सुरवात केली आहे. दुसरीकडे नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा तापी, आदिवासी या दोन सहकारी व ॲस्टोरिया (पुष्पदंतेश्वर) या खासगी, जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी व संत मुक्‍ताबाई शुगर ॲन्ड एनर्जी, जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट १, रामेश्वर, समर्थ युनिट २ या सहकारी तर समृद्धी शुगर, श्रद्धा एनर्जी अॅन्ड इन्फा (बागेश्वरी) या खासगी, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, जयभवानी, माजलगाव, वैद्यनाथ, छत्रपती या सहकारी तर येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्यांचा गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांमध्ये समावेश आहे.

नंदूरबार जिल्ह्यात तीन साखर कारखान्यांनी २ लाख २४ हजार २१६.७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ८० हजार २२० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या जिल्ह्यात साखरेचा उतारा ८.०४ इतका राहिला. जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखान्यांनी १ लाख ४० हजार ६६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ५ हजार २५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगावच्या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.४८ इतका राहिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ३ लाख ७५ हजार ३६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ०२ हजार ५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा ८.०५ टक्‍के इतका राहिला. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ५ लाख २७ हजार ८०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख १९ हजार २५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.

या जिल्ह्याचा साखर उतारा ७.९४ टक्‍के इतका राहिला. बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी ९ लाख ०१ हजार ११२.८४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख २९ हजार २०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा ८.०९ इतका राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

साखर उतारा ९.५० टक्‍क्‍यांच्या आतच यंदा उस गाळपास सुरवात करणाऱ्या मराठवाड्यातील तीन व खानदेशातील तीन मिळून सहा जिल्ह्यांतील वीसही कारखान्यांचा साखर उतारा ९.५० च्या आतच आहे. सर्वाधिक साखर उतारा बीड जिल्ह्यातील येडेश्वरी शुगरचा ९.३२ टक्‍के इतका आहे. तर सर्वात कमी साखर उतारा जालन्यातील समृद्धी शुगरचा ६.१२ टक्‍के इतकाच आल्याची माहिती साखर विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com