‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही’

‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर  नाणार प्रकल्प होणार नाही’
‘ग्रामस्थांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही’

मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच वर्षावर जाऊन भेट घेतली. बैठकीनंतर नाणार रिफायनरी प्रकल्पाला जर ग्रामस्थांचा विरोध असेल, तर हा प्रकल्प होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी ठाकरे यांना दिले आहे. दरम्यान, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड जवळपास १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. या दोन प्रमुख नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली असण्याच्या शक्यतेवरून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या वेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरी विरोधातल्या ग्रामस्थांचे शिष्टमंडळ तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.  या वेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे नाणार प्रकल्पाला असहमती दर्शवणाऱ्या पत्रांचे गठ्ठे सोपवले. उद्धव ठाकरे म्हणाले, की ग्रामस्थांची जी भूमिका तीच शिवसेनेची भूमिका आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना असहमती पत्राचे गठ्ठे दिले. वाडवन बंदराला शिवशाहीचे सरकार असताना लोकांनी विरोध केला, तेव्हा तो रद्द केला होता. विकासाच्या नावाखाली कोकणातील वैभव मरू देऊ नका हे आम्ही स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com