गरज पडल्यास अाणखी साखर अायात : केंद्रीय अन्नमंत्री पासवान

केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान
केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान

नवी दिल्ली: देशात जर साखरेची गरज पडल्यास अाणखी साखर अायातीसाठी सरकार परवानगी देऊ शकते, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले अाहे.

सध्या देशात साखरेचा पुरेसा साठा शिल्लक असल्याचेही त्यांनी म्हटले. दक्षिण भारतात साखरेचे दर नियंत्रणात राखण्याचे कारण देत केंद्र सरकारने तीन लाख टन कच्ची साखर आयात करण्यास नुकतीच परवानगी दिली. अर्थात, त्यासाठी २५ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. अाता अाणखी साखर अायात करण्याचे संकेत अन्नमंत्री पासवान यांनी दिले अाहेत. 

दक्षिण भारतात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अाहे. त्यासाठी दक्षिण भारतातील तीन-चार राज्यांतील साखरेच्या मागणीच्या पूर्ततेसाठी तीन लाख टन साखर अायात केली जात अाहे. महाराष्ट्र अाणि उत्तर प्रदेशात साखरेचा तुटवडा जाणवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले अाहे.

दरम्यान, देशात साखर साठा ७ दशलक्ष टन शिल्लक अाहे. गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाले होते. तरीही देशात साखरेचा पुरेसा साठा शिल्लक अाहे. दरवर्षी साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या अाठवड्यात अथवा दिवाळीनंतर गाळप हंगाम सुरू होतो. मात्र काही राज्यांत यंदा गाळप हंगाम दरवर्षीपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता अाहे. यामुळे स्थानिक पातळीवर साखरेचा पुरवठा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com