नवी दिल्ली ः देशात यंदा (२०१७-१८) साखर उत्पादन २४.८५ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज केंद्रीय अन्न मंत्रालयाने व्यक्त केला अाहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साखर उत्पादन २०.२ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
सर्व राज्यांतील साखर अायुक्तांच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत देशात साखर उत्पादन २५.८ दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) २५.१ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज बांधला अाहे.
महाराष्ट्र अाणि कर्नाटकातील साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुधारणा होण्याची शक्यता अाहे. तसेच उत्तर भारतात उच्च उत्पादन मिळणे अपेक्षित असून यामुळे देशातील साखर उत्पादन वाढणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अाणि कर्नाटक ही राज्ये साखर उत्पादनात देशात अाघाडीवर अाहेत. या राज्यांतून यंदा १९.८ दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित असल्याचे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे. महाराष्ट्रात ७.३५ दशलक्ष टन उत्पादन मिळण्यात अंदाज अाहे.
दरम्यान, देशभरातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये १ लाख १९ हजार ९८२ टन साखर उत्पादन घेतले अाहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाने दिली अाहे.