विदर्भाला पावसाचा फटका

विदर्भाला पावसाचा फटका
विदर्भाला पावसाचा फटका

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या या सरींनी पिकांचे जास्त नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला, तरी पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे.

अमरावती विभागातील अकोला, अमरावती, नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी (ता. १५) रात्री तसेच शुक्रवारी (ता. १६) सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांचा गहू उभा आहे. तर संत्र्याच्या आंबिया बहरालादेखील या वातावरणाचा फटका बसू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. आंब्याच्या झाडाला बारीक फळधारणा झाली आहे. लिंबूच्या आकाराच्या असलेल्या या फळांचीदेखील गळ झाल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. दरम्यान अमरावती विभागात नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी प्राथमिक अहवाल मागविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. नागपूर विभागात नुकसानकारक पाऊस झाला नसल्याचेदेखील कृषी विभागाने सांगितले.

"पावसाचा उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. फळझाडांचादेखील बहर किंवा फळ गळण्याची शक्‍यता या वातावरणामुळे आहे. सूर्यप्रकाशाअभावी झाडांची अन्नद्रव्य शोषण्याची प्रक्रिया मंदावते, वेलवर्गीय भाजीपाल्यावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. आंबा मोहर किंवा छोट्या आकाराच्या फळांचीदेखील गळ संभवते' - मोहन खाकरे, कृषी विद्यावेत्ता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com