व्यापाऱ्यांनी वरवट बकालला उपबाजार ठेवला बंद

परवाने निलंबनाविरोधात व्यापाऱ्यांनी वरवट बकालला उपबाजार ठेवला बंद
परवाने निलंबनाविरोधात व्यापाऱ्यांनी वरवट बकालला उपबाजार ठेवला बंद

बुलडाणा : संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने चार व्यापाऱ्यांचे परवाने १५ दिवसांसाठी निलंबित केल्याने अाता उर्वरित व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास नकार दिल्याने पेच तयार झाला अाहे. वरवट बकाल येथील उपबाजारत खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली अाहे.  या संदर्भात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता.३) बाजार समितीसह सहकार विभागाला निवेदन देत वरवट बकाल उपबाजार बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. बाजार समितीने काही दिवसांपूर्वीच उमेश अशोक टावरी, अोमप्रकाश पालीवाल, कमलकिशोर गांधी, पीयूष अग्रवाल या चौघांचे व्यापारी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित केले. या चौघांचा हमीभावाने खरेदी झालेल्या तुरीच्या घोळात सहभाग असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कारण देत बाजार समितीने ही कारवाई केली होती. ही कारवाई चुकीची असल्याचे उर्वरित व्यापाऱ्यांचे म्हणणे अाहे. राजकीय हेतूने कारवाई केली असून, ती चुकीची अाहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे निलंबित परवाने जोपर्यंत पूर्ववत केले जात नाहीत तोवर कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार नसल्याचे नीलेश राठी, माया गांधी, प्रियांका इंगळे, प्रेमचंद चांडक, गजानन गोतमारे, ललीत राठी, तुळशीराम गांधी, कृष्णकुमार चांडक, भाईलाल चांडक या व्यापारी, अडत्यांचे निवेदनात म्हणणे अाहे.     बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या या खेळामुळे सर्वसामान्य शेतकरी वेठीस धरला गेला अाहे. अाठवड्यात शनिवारी येथे मोठा बाजार भरतो. नेमके याच दिवशी खरेदी विक्री बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com