वाघूर धरणातील पाणी शेतीसाठी आरक्षित करावे

वाघूर धरणातील पाणी  शेतीसाठी आरक्षित करावे
वाघूर धरणातील पाणी शेतीसाठी आरक्षित करावे

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या वाघूर धरणातील पाणी शेतीसाठी आरक्षित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भाग व शेतीला देखील प्राधान्य असावे, अशी मागणी वाघूर धरण सिंचन लाभधारक समितीतर्फे करण्यात आली आहे.

समितीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी पाऊस कमी झाला. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. अशा स्थितीत तातडीने वाघूरमधून पाणी सोडल्यास कापूस व इतर पिके जगतील. रब्बीच्या पेरणीसाठी चांगला वाफसा जमिनीत राहील. चारा पिकांची पेरणी वाढेल व पशुधनास पुढे चारा उपलब्ध होईल. नशिराबाद, आसोदा भागात वाघूरच्या पाण्यासाठी अनेक शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. जळगाव महापालिकेस पाणी मिळावे, यासाठी या प्रकल्पाची उंची वाढविली. परंतु पालिका पाणी पट्टीही भरीत नाही. शेतकऱ्यांना कुठले पाणी दिले, हा प्रश्‍नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

या धरणाचा चांगला विकास केला असता तर ७४ हजार हेक्‍टरला लाभ झाला असता. भुसावळ, जळगावमधील मोठ्या क्षेत्रात पाणी पोचले असते. वाघूरच्या पाण्यात लाभार्थी वाढत आहेत. पाटचाऱ्या मात्र कोरड्याच राहतील, असे दिसते. यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, राजेंद्र चौधरी, प्रदीप भोळे, किशोर चौधरी, तुषार महाजन, मिलींद चौधरी, ज्ञानदेव चौधरी, दीपक नारखेडे, धनराज कोल्हे, संजय ढाके, योगेश भोळे, संजय चिरमाडे यांच्या या मागण्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com