गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा

गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा

जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा धरणाच्या पाण्याचे आवर्तन अजूनही जळगाव, धरणगावनजीक नदीत पोचलेले नाही. नदीच्या पाण्याची प्रतीक्षा शेतकरी, ग्रामस्थांना आहे. 

मागील आठवड्यात धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट दूर व्हावे यादृष्टीने हे पाणी सोडले आहे. परंतु, पाण्याचा वेगच कमी असल्याचे सांगितले जात आहे. 

धरणातून या हंगामात रब्बीला पाणी मिळालेच नाही. धरणात सुमारे ४७ टक्के जलसाठा होता. पाणी पिण्यासाठी राखीव केले आहे. गिरणाकाठ कोरडाठाक व टंचाईग्रस्त झाला आहे. लिंबू, भाजीपाला व केळीची शेती संकटात सापडली आहे. शिवारात पाणी पोचविण्याऐवजी पिण्याच्या पाण्याला प्रशासनाने महत्त्व दिले. तिसरे आवर्तन ५ मार्च रोजी सुटेल, अशी अपेक्षा होती. परंतु ते १० दिवस उशिराने सुटले. पाणी अजून पाचोरा, भडगावनजीकच नदीत आहे. 

उष्णता वाढल्याने नदीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पाण्याची गती मंद आहे. परंतु धरणातून विसर्ग काहीसा वाढविला तर पाणी अधिक गतीने पुढे सरकेल व लवकर जळगाव, धरणगाव तालुक्‍यात पोचू शकेल. नदीकाठच्या अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी घटली आहे. यामुळे शेतकरी, ग्रामस्थांमध्ये पाणी केव्हा पोचेल, याची प्रतीक्षा आहे. 

पाणी अडविण्यासाठी काही ग्रामपंचायतींनी वाळू, मातीचे बंधारे तयार केले आहेत. यात पाणी महिनाभर साचले तर पाण्याचे संकट दूर होईल. तसेच नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळीदेखील वाढू शकते. पाणी कानळदा (ता. जळगाव) पर्यंत पोचल्यानंतर धरणातील विसर्ग बंद होईल. परंतु कानळदा गावाच्या पुढे पाणी पोचल्यावर विसर्ग बंद करावा, अशी मागणीदेखील शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com