यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे अधिग्रहण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. तसा आराखडाही जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतींनी सादर केल्याचे वृत्त आहे. विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. 

यावर्षी जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. त्यावर मात करण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव आहे. या विहिरींवरुन पाणीटंचाईग्रस्त भागात पाणी पोहविण्यासाठी ८९ टॅंकरची मदत घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने टॅंकरचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले आहे. गरज भासताच हे टॅंकर सुरू केले जातील. यंदा पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना प्रस्तावित आहेत.

जिल्ह्यात ८९ टॅंकर प्रस्तावित आहेत, असे असेल तरी आतापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असलेल्या सहा गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये फत्तेपूर (बाभूळगाव), खरडपूर (नेर), भांडेगाव (दारव्हा), बाळवाडी (पुसद), पाळोदी, मारवाडी (पुसद) या गावांचा समावेश आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ १०८ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी ८९ टॅंकरने केला जाणार आहे. यावर्षी १९ टॅंकर कमी लागणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com