हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंद

पोपटराव पवार
पोपटराव पवार

नगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये नवरात्रोत्सवानिमित्ताने मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षीपेक्षा २८६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता पाहता नवरात्रीचा मुहूर्त साधत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी त्यांच्या हिवरेबाजार गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंद मांडत गावातील पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन केले.

हिवरेबाजारमध्ये दर वर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला. ग्रामस्थांशी चर्चा करताना पोपटराव पवार म्हणाले, की दर वर्षीपेक्षा यावेळेस वेगळ्या पद्धतीने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने आपल्याला पिकांऐवजी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, उपलब्ध फळबागांसाठी लागणारे पाणी ठिबकचा जास्तीत जास्त वापर केला तर आपण केलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार आपल्याला अडचण येणार नाही; अन्यथा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. या वेळी या विशेष ग्रामसभेस दिल्लीवरून आलेले नॅशनल लेव्हल मॉनिटरिंग (एनएलएम)चे अधिकारी नीरव त्रिवेदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com