सातारा जिल्ह्यातील सहा धरणांतून विसर्ग कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १४.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना, तारळी, मोरणा, कण्हेर, उरमोडी, महू या सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सातारा, जावली, पाटण, महाबळेश्वर या तालुक्‍यांतील काही ठिकाणी अधूनमधून दमदार सरी बरसत होत्या. इतर तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोयना, कण्हेर, मोरणा, तारळी, उरमोडी, महू या सहा धरणांतून सध्या विसर्ग सुरू आहे.

यामध्ये कोयना धरणातून १७,४५४, कण्हेर धरणातून ५००, उरमोडी धरणातून ४००, तारळी धरणातून २१७२, मोरणा धरणातून २२८० व महू धरणातून ४७९ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरण क्षेत्रातील कोयना येथे ९३, नवजा येथे १२९ तर महाबळेश्वर येथे ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठ्यात १.०४ टीएमसीने वाढ होऊन धरणात ८२.५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस (मिमी) ः सातारा १०.८०, जावली १५.८२, पाटण २१.२७, कराड ७.१५, कोरेगाव ३.०२, खटाव १.७३, माण ०.१४, फलटण  ०, खंडाळा १.७०, वाई ४.४६, महाबळेश्वर ९८.६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com