नगर जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटली

पाणीटंचाई
पाणीटंचाई

नगर  ः जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊन एक महिना झाला तरीही टंचाई परिस्थिती कायम आहे. मात्र या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातून टॅंकरची मागणी कमी होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता ही संख्या घटून ६२ वर आली आहे. जुलै महिना अखेरपर्यंत जिल्ह्यातील पाणीटंचाई संपेल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.

जिल्ह्यामध्ये साधारण तीन वर्षांपूर्वी सातशेवर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानातून झालेली कामे व गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे टॅंकरचा आकडा यंदा शंभरीही गाठू शकला नाही. यंदा अगदी शेवटच्या महिनाभरात काही गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. पावसाला यंदा उशीर झाल्यामुळे आता पाणी स्रोतावर परिणाम झालेला असला तरी या आठवड्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाने काही प्रमाणात टंचाई वर मात केली आहे.

या आठवड्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे तीन गावे व पाच वाड्या टॅंकरमुक्‍त झाल्या. सध्या जिल्ह्यामधील ५७ गावे व १९२ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख सात हजार ५४७ नागरिकांना ६२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १४ सरकारी व ४८ खासगी टॅंकर आहेत. श्रीगोंदे, जामखेड, कर्जत, शेवगाव, नेवासे, राहुरी, श्रीरामपुरात मात्र टॅंकरने पाणी देण्याची गरज पडली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com