नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई

नगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असली, तरी उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील ६ तालुक्‍यांतील ३६ गावे आणि १४० वाड्या-वस्त्यांमधील ७६ हजार ७६९ लोकांना ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने मंजूर केलेल्या संपूर्ण खेपा होत नसल्याची बाबही समोर आली आहे.

उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यातील सुमारे दहा ते बारा तालुक्‍यांत गेल्या दहा वर्षांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळाच्या कालावधीतील मागील चार वर्षांत तर पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढली होती. मात्र राज्यात चार वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यांत गेल्या दोन वर्षांत या अभियानातून चांगली कामे झाली असल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे.

दोन वर्षांपूर्वी (२०१६) जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरचा आकडा ८२६ वर गेला होता. गेल्या वर्षी काहीसा हा आकडा कमी होऊन ११४ वर आला. यंदा मात्र अगदी मे महिन्यापर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

सध्या जिल्ह्यामधील संगमनेरमधील १४ गावे आणि ५५ वाड्या, अकोले तालुक्‍यात चार गावे आणि चार वाड्या, पारनेर तालुक्‍यात नऊ गावे आणि ६१ वाड्या, नगर तालुक्‍यात पाच गावे, कोपरगाव तालुक्‍यातील एका गावांत तर पाथर्डीतील दोन गावे आणि पाच वाड्यांत सध्या पाणीटंचाई आहे. श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहाता, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रींगोदा या तालुक्‍यात मात्र पाणीटंचाई नाही. तालुकानिहाय टॅंकरसंख्या : संगमनेर ः १४, अकोले ः ४, नगर ः ५,पारनेर ः १६, कोपरगाव ः १ पाथर्डी ः २.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com