बनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळती

``गावाजवळ वांग नदीवर बंधारे बांधले असून, नसल्यासारखेच आहेत. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही पाटबंधारे विभाग इतकी वर्षे गप्पच आहे. या प्रश्‍नी शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.`` - सुरेश सपकाळ, शेतकरी, बनपुरी.
बनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळती
बनपुरी येथील बंधाऱ्यातून पाणीगळती

ढेबेवाडी, जि. सातारा : बनपुरी (ता. पाटण) येथील कोल्हापूर पद्धतीच्या दोन्ही बंधाऱ्यांतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. महिंद धरणातून पाणी सोडूनही गळतीमुळे बंधारे रिकामे होत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पाणीपट्टी भरूनही शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महिंद धरणाचे लाभक्षेत्र धरणापासून सुमारे चार किलोमीटर परिसरात बनपुरी गावापर्यंत आहे. ८५ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या धरणाचे ३०४ हेक्‍टर सिंचन क्षेत्र असून लाभक्षेत्रात वांग नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे चार बंधारे बांधून पाणी अडविण्यात येत आहे. त्यातील दोन बंधारे बनपुरीजवळ आहेत. २००० मध्ये धरणाची घळभरणी झाल्यानंतर बंधाऱ्यांचीही कामे मार्गी लागून नदी काठावरील सिंचनक्षेत्रात वाढ झाली. पण, बंधाऱ्यांच्या गळतीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात धरण पूर्ण क्षमतेने भरते. त्यानंतर जूनपर्यंत पाणी सोडण्याची रोटेशन निश्‍चित केलेली असतात. मात्र, गळतीमुळे बनपुरी जवळच्या बंधाऱ्यात पाणीच साठून राहत नसल्याने क्षणात बंधारे रिकामे होत आहेत. पाटबंधारे विभाग सिंचनाखालील क्षेत्रानुसार शेतकऱ्यांकडून नियमित पाणीपट्टी वसुली करीत असला, तरी बंधाऱ्याच्या या अवस्थेमुळे नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com