पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अनिर्बंध पाणी उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, यापुढे जलाशय अथवा कालव्यातून पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने ऑक्टोबर महिन्यापासून राज्याच्या विविध भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. राज्य सरकारने ऑक्टोबरअखेर १५० तालुक्यात तसेच २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. येत्या काही महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने अनधिकृत पाणी उपशाला चाप लावण्याचे ठरवले आहे. विनापरवानगी पाणी उपसा करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून पाणी चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर त्यांच्यावर दंडात्मक करवाई करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. पाण्याचा उपसा रोखण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बेकायदा पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  या पथकात जलसंपदा विभागाचा शाखा अभियंता, महावितरण कंपनीचा शाखा अभियंता, महसूल विभागाचा मंडल अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांचा समावेश असेल. या पथकामार्फत दंडवसुली, वीजजोडणी खंडित करण्याचे काम केले जाईल. या कारवाईचा मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com