पाणीटंचाईमुळे आटपाडीतील रब्बी पिके धोक्‍यात

रब्बी पिके वाळू लागली
रब्बी पिके वाळू लागली

सांगली : आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाईमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत. तालुक्‍याच्या दक्षिण भागातील पिके वाळून जाऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. टेंभू सिंचन योजना सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

तालुक्‍यात परतीचा पाऊस चांगला झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येणार, अशी आशा शेतकऱ्यांना होती. तलाव व विहिरींमधील पाणीपातळीत वाढ झाली. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा घेतला. पिके जोमाने वाढू लागली. तालुक्‍याला टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले आहे. टेंभू सिंचन योजनेचे पाणी मिळले. त्यामुळे पाणीटंचाई भासणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.

मात्र, गेल्या महिनाभरापासून या भागात पाणीटंचाई भासू लागली आहे. तालुक्‍यातील शेतकरी टेंभू सिंचन योजना सुरू करण्याची मागणी करत आहेत; मात्र ही योजना सुरू करण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील रब्बी हंगामासह अन्य पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

तालुक्‍यात ज्वारीबरोबरच मक्‍याची पेरणी सर्वाधिक झाली आहे; मात्र पाण्याची कमतरता असल्याने पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. बहुतांश भागातील पिके वाळून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासन केवळ पंचनामे करते; पण नुकसानभरपाई मिळत नाही. अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com