पुणे, साताऱ्यातील ७ तालुक्यांत अद्यापही पाणीटंचाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, पूर्व भागात असलेल्या दुष्काळी पट्ट्यात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील ७ तालुक्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. पुणे व सातारा जिल्ह्यांतील २६ गावे ११२ वाड्यांना २३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.  

पावसाने हजेरी लावल्यानंतर विभागातील पाणीटंचाई कमी होत आहे. मात्र, सातारा जिल्‍ह्याच्या खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा या चार तालुक्यांतील २२ गावे आणि ७० वाड्यांमधील ३४ हजार ५४७ लोकसंख्या आणि ३ हजार १६७ जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत असून, पाणीपुरवठ्यासाठी २२ टॅंकर धावत आहेत.

पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यांमधील ४ गावे ४२ वाड्यांमधील ११ हजार १२ लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. टंचाईग्रस्त भागातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी दमदार पावसाची आवश्‍यकता अाहे.

विभागातील टॅंकरस्थिती
तालुके  गावे वाड्या  टॅंकर
पुरंदर     १३ 
बारामती २५
दौंड १ 
खटाव २८
माण ८  ४२
कोरेगाव 
खंडाळा  १  ०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com