पुणे विभागात ७० टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई

पुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. विभागातील ७७ गावे ३४४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ७० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरच्या पाण्यावर सुमारे १ लाख ११ हजार लोकसंख्या आणि सुमारे १० हजार जनावरांची तहान भागत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी होऊ लागली असली तरी अद्यापही तेथे विभागातील सर्वाधिक पाणीटंचाई आहे. साताऱ्यातील नऊ तालुक्यांतील ४३ गावे १२६ वाड्यांमधील सुमारे ४६ हजार लोकसंख्या आणि १० हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३६ टॅंकर सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून, दहा तालुक्यांतील २९ गावे २०५ वाड्यांमधील ५७ हजार २५७ लोकांना ३१ टॅंकरने पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील पाच गावे आणि १ वाडी-वस्तीवरील सुमारे ६८०० लोकांना पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याने पाणीपुरवठ्यासाठी तीन टॅंकर सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील दोन वाड्यांमध्ये टंचाई जाणवत असल्याने ६७१ लोकसंख्या अाणि २९० पशुधनाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सोलाूपर जिल्ह्यात यंदा पाणी टंचाई तीव्रता नसल्याने टॅंकर सुरू करावे लागले नाहीत. मात्र पाणीपुरवठ्यासाठी दोन स्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले आहे.

विभागातील टंचाईग्रस्त भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी   ७२ विहिरी किंवा बोअरवेल आदी जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आल्याची विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

विभागातील पाणीटंचाईची स्थिती

जिल्हा गावे वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
पुणे २९ २०५ ५७,२५७ ३१
सातारा  ४३ १२६ ४५,९५३ १०,१९१ ३६
सांगली  ६७८२
काेल्हापूर ६७१ २९०  ०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com