सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई
सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. या दोन तालुक्‍यांतील सहा गावे व १५ वाड्यावस्त्यावरील ४९९५ लोकसंख्येस पाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाई वाढ होऊ लागली आहे. यामध्ये माण व खटाव या दुष्काळी तालुक्‍यातील सहा गावांत व १५ वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला टॅंकर सुरू करावे लागले आहेत. यामध्ये माण तालुक्‍यात पाच गावे व १४ वाड्यावस्त्यांना चार टॅंकरद्वारे, तर खटाव तालुक्‍यातील एक गाव व एका वाडीवस्तीवर एका टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पिण्याचे पाणी संरक्षित ठेवण्यासाठी या दोन तालुक्‍यांतील पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जलसाठ्यांमधील पाणी कमी होऊ लागल्याने टंचाईत वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यात टंचाईत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी जाणवत असली तरी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून पाणीटंचाई वाढ होऊ लागली असलीतरी गतवर्षीच्या तुलनेत मात्र कमी प्रमाणात टंचाई जाणवत आहे. गतवर्षी २० एप्रिलला ४५ टॅंकरद्वारे ४६ गावे २८३ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात होता.

या वर्षी मात्र अवघी सहा गावे व १५ वाड्यावस्त्यांवर पाच टॅंकर सुरू करण्यात आले आहे. माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com