जळगाव जिल्ह्यातील ७७ गावांत पाण्याची टंचाई
जळगाव जिल्ह्यातील ७७ गावांत पाण्याची टंचाई

जळगाव जिल्ह्यातील ७७ गावांत पाण्याची टंचाई

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या २० टक्के पाऊस झाला अाहे. जुलैचा पहिला आठवडा उलटला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने आजही जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये ६० टॅंकर सुरू आहेत. मागील महिन्यात ७३ गावे टंचाईग्रस्त होती. आता ही संख्या चारने वाढून ७७ झाली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी सरासरीच्या केवळ ७५ टक्के पाऊस झाला होता. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. जूनअखेर १४५ गावांमध्ये ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. तुलनेत यंदा टंचाईची गावे कमी झाली आणि टॅंकरच्या संख्येतही घट झाली. विशेषतः बोदवड, पाचोरा, भडगाव या तालुक्‍यांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
त्याचबरोबर विहीर अधिग्रहण २४६ गावांमध्ये झाले होते. अधिग्रहणाचा हक्क ९६ ठिकाणी सोडण्यात आला आहे. एरंडोल, धरणगाव, चोपडा, बोदवड, पाचोरा, भडगाव या गावामधील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. यावल, रावेरला टॅंकर सुरू नव्हते.  
तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे
तालुका   गाव  टॅंकर
जळगाव   ३ 
जामनेर   १७ १८
भुसावळ २  
मुक्ताईनगर   ३
चाळीसगाव   १०
अमळनेर  २९     १६
पारोळा    १६     ९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com