खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घट

खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घट
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घट

धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यात तीन ते चार मीटरपर्यंत घट आहे. शहादा तालुका आणि धुळे, शिंदखेड्याच्या पूर्व भागातही दुष्काळी स्थिती आहे. आगामी सहा महिने कसे काढायचे, या प्रश्‍नाने शेतकऱ्यांना घेरले आहे.  

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व साक्री भागात समस्या बिकट आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार पूर्व, शहादा पूर्व भागात जलसंकट तीव्र होत आहे. कांदा लागवड रखडली आहे. मका, गहू ही अधिक पाण्याच्या पिकांची पेरणी थांबली आहे. पूर्वहंगामी कापसाला पाणीटंचाईचा फटका बसत आहे.  

दुग्धव्यवसावर परिणाम झाला आहे. चाऱ्याअभावी अनेक दुग्धव्यावसायिक वेगळ्या व्यवसायांकडे वळत आहेत. डिसेंबरमध्ये शेतीची कामे संपणार आहेत. त्यामुळे त्यापुढील सहा महिन्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. नंदुरबारमधील मिरचीची शेती उद्‌ध्वस्त झाल्यात जमा आहे. कोठली, बामडोद, पळाशी, भालेर, लहान शहादे, कोळदा भागात जलसंकट वाढले आहे. त्यामुळे मिरचीचे पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

धुळे जिल्ह्यातील कापडणे, न्याहळोद, लामकानी, जापी, धनूर, कौठळ भागातील भाजीपाल्याची शेती संकटात आहे. शिरपूर तालुक्‍यातील सातपुडालगतच्या गावांमध्येही जलपातळी घटल्याने ऊस, केळीच्या शेतीला फटका बसत आहे. धुळे तालुक्‍यातील कांद्याची शेती अडचणीत आहे. लागवड कमी आहे. सुमारे दीड ते दोन हजार हेक्‍टरवरील कांदा शेतीला पाणीटंचाईचा फटका बसला आहे. शहादाच्या पूर्व भागातील पपईची शेती संकटात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com