जायकवाडीतील पाणीसाठा कायम, परभणीसाठी सोडले पाणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : नऊ वर्षांनंतर तुडुंब जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा कायम ठेवण्याचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. सोबतच परभणी जिल्ह्याच्या मागणीनुसार डाव्या कालव्यातून १००० क्‍युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रकल्पात ऊर्ध्व भागातील प्रकल्पांमधून १ जूनपासून जवळपास ७८.४१ टीएमसी पाणी आले. गत चोवीस तासांत ०.२० टीएमसी पाणी प्रकल्पात दाखल झाले. प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा २९०९.०४१ दलघमीवर पोहाेचला असून, जिवंत पाणीसाठा २१७०.९३५ दलघमीवर पोहाेचला आहे. प्रकल्पात  ऊर्ध्व भागातून गुरुवारी (ता.५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास २३१६ क्‍युसेकने आवक सुरू होती.

प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ५०० क्‍युसेकने माजलगावच्या प्रकल्पासाठी पाणी सोडले जात असून, परभणीच्या मागणीनुसार १००० क्‍युसेकने डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com