पाणी चोरीच्या भीतीने साठवण तलाव कुलूपबंद

पाणी चोरीच्या भीतीने साठवण तलाव कुलूपबंद
पाणी चोरीच्या भीतीने साठवण तलाव कुलूपबंद

वर्धा : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याची चोरी होण्याच्या शक्‍यतेने कारंजा तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या ठाणेगावातील शेतकरी व ग्रामपंचायतीने थेट तलावाचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी असलेल्या रेग्युलेटर व्हॉललाच कुलूप ठोकले आहे. हा तलाव ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आला असून, पाणीवाटपाचे नियोजन आता मागणीनुसार होणार आहे.

कारंजा तालुका दुष्काळाच्या यादीत आहे. भविष्यातील परिस्थितीमुळे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पाणी चोरी, अपव्यय टाळण्यासाठी नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव येथील तलावाचे पाणी कुलूपबंद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांनी ही युक्‍ती लढवली. सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाने या साठवण तलावाची निर्मिती केली. एवढ्या वर्षात तलावचे कालवे अनेक ठिकाणी बुजले, नादुरुस्त झाले. या तलावाची जलयुक्‍त शिवार योजनेतून दुरुस्ती करण्यात आली. चार किलोमीटर कालव्याचे खोलीकरण करण्यात आले. तलावाचे देखील खोदकाम करून गाळ काढण्यात आला.

या तलावाची ५८२ सहस्त्र घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता आहे. आज त्यात अंदाजे ५५० सहस्त्र घनमीटर म्हणजे ९० टक्‍के पाणी शिल्लक आहे. जे यंदा रब्‍बी पिकासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जलयुक्‍त शिवारच्या कामामुळे तलावातून १०० हेक्‍टरची सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. इतर लघू सिचंन प्रकल्पांतील पाण्याचाही काटकसरीने वापर करावा, अशी माहिती लघू सिंचन विभागाच्या उपअभियंत्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com