खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा

खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा

जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील प्रकल्प वगळता इतर धरणांमध्ये अत्यल्प साठा आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, चाळीसगावमधील मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. धुळे जिल्ह्यातही पांझरा, बुराई, मालनगाव प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये जेमतेम साठा आहे. पावसाळ्याचे फक्त १२ दिवस राहिले आहेत. प्रकल्प, धरणे १०० टक्के भरतील की नाही, याबाबत प्रश्‍न आहे.

गिरणा धरणाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, भडगाव भागातील शेतीला रब्बीसाठी आवर्तन दिले जाते. २१ हजार हेक्‍टरला या धरणाचा लाभ होतो. त्यात फक्त ४८.४० टक्के जलसाठा आहे. या धरणातून फक्त दोनच आवर्तने यंदा रब्बीसाठी मिळतील, अशी माहिती आहे.

वाघूर धरणातही ४६.७३ टक्के जलसाठाअसून त्यातूनही फक्त दोनच आवर्तने रब्बीसाठी मिळू शकतील. त्यावर सात हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बी क्षेत्र अवलंबून असणार आहे. हतनूरमध्ये ९९.४५ टक्के जलसाठा आहे. यातून रब्बीसाठी तीन आवर्तने मिळतील. चोपडा, यावल, रावेर तालुक्‍यासाठी हतनूर धरणाचा लाभ होतो.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा आहे. परंतु त्यातून पाणी शेतापर्यंत पोचू शकत नाही. या पाण्यामुळे फक्त विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

  धुळे जिल्ह्यातील प्रकल्प साठा ( टक्के) पांझरा प्रकल्प १००, मालनगाव ९९.१६, बुराई ८२.१३ , करवंद ६७.४७, अनेर ८४.५७, अमरावती ००

 जळगाव जिल्ह्यातील धरणांतील साठा (टक्के) मन्याड, बोरी, अंजनी, भोकरबारी, बहुळा- ००, तोंडापूर ५.७१, गूळ ८५.७६, हिवरा ३४.०६, अग्नावती ७१.७६, अभोरा, मंगरूळ, सुकी -१००, मोर ५४.१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com