नगर जिल्ह्यात ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

नगर जिल्ह्यात ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
नगर जिल्ह्यात ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

नगर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यामधील ६० गावे आणि २१९ वाड्यांवरील एक लाख २२ हजार लोकांना ६९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाऊस लांबत असल्याने पाणीटंचाईत वाढ होत असून टॅंकरद्वारे पाणी देण्याची मागणीही होत आहे. जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांच्या काळात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. टॅंकरची संख्या अगदी अगदी ८०० पर्यंत गेली होती.

दोन वर्षांत झालेली जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि पावसाचेही प्रमाण चांगले असल्याने पाणीटंचाईचे प्रमाण कमी झाले. गेल्यावर्षी टॅंकरची संख्या १०० पर्यंत गेली होते. यंदा तर संपूर्ण उन्हाळ्यात टंचाई जाणवली नाही. अगदी बोटावर मोजण्याएवढ्या गावांत टॅंकर सुरू होते. मात्र आता पाऊस लांबत आहे.

त्यामुळे काही भागात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली असल्याने पावसाच्या तोंडावर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. सध्या संगमनेर तालुक्‍यातील २१ गावे आणि ८४ वाड्यांना २३ टॅंकर, अकोले तालुक्‍यातील चार गावे आणि १९ वाड्यांना पाच टॅंकर, कोपरगाव तालुक्‍यात ३ गावे आणि ६ वाड्यांना तीन टॅंकर, नगर तालुक्‍यात सात गावांना सात टॅंकर, पारनेरला १६ गावे आणि ८० वाड्यांना १८ टॅंकर, पाथर्डी तालुक्‍यात ९ गावे आणि २४ वाड्यांना १२ टॅंकर अशा ६० गावे आणि २१९ वाड्या-वस्त्यांना ६९ टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. त्यात १६ सरकारी तर ५३ खाजगी टॅंकर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com