नगर जिल्ह्यात ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : शिवारातील पाण्याचा ताळेबंद बिघडल्याने जिल्ह्यातील तहानलेल्या गावांची संख्या वाढू लागली आहे. या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन सरसावले आहे. सुरवातीला केवळ दोन टॅंकर धावत होते. मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ४७ गावे आणि १६८ वाड्या-वस्त्यांना ४५ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात तहानलेल्या गावांची संख्या वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. प्रशासनातर्फे जिल्हाभरातील ८२ हजार ८६७ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या मागील १५ वर्षांत सातत्याने वाढत गेली. २०१५ मध्ये टॅंकरची संख्या तब्बल ८२८ एवढी होती.

कमी झालेला पाऊस, पडलेल्या पावसाचे पाणी साठविण्याची घटलेली क्षमता आणि शिवारात असणाऱ्या पाण्याचा अनिर्बंध उपसा करण्याची चढाओढ या प्रमुख कारणांनी तहानलेल्या गावांची संख्या वाढत गेली. हेच चित्र जिल्ह्यातील गाव-खेड्यांनी वर्षानुवर्षे अनुभवले. यंदा टॅंकर सुरू करण्याची मागणी करणारे प्रस्ताव सर्वप्रथम संगमनेर तालुक्‍यातून दाखल झाले. १२ एप्रिलला दोन टॅंकर जिल्हा प्रशासनाने मंजूर केले होते. आजअखेर टॅंकरची संख्या वाढून ती ४५ वर गेली आहे.  

तालुकानिहाय टॅंकर स्थिती
तालुका टॅंकरसंख्या गावे
पाथर्डी २० १८
संगमनेर    १६ १८
पारनेर ८  १०
नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com