हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार नागरिकांना पाणी

टॅंकरद्वारे ५६ हजार नागरिकांना पाणी
टॅंकरद्वारे ५६ हजार नागरिकांना पाणी

हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पाच तालुक्यांतील ३२ गावे आणि ८ वाड्या-तांड्यांवरील ५६ हजार ३५० नागरिकांना ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी ४४९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

वाढत्या उपशामुळे, तापमानामुळे जिल्ह्यातील जलसाठे आटले आहेत. स्रोतांना पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ३६३ गावांतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लोकवस्त्यांच्या संख्येत भर पडत आहे.

विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहणाची संख्या देखील वाढत आहे. हिंगोली तालुक्यातील कनका, लोहगाव, जयपूरवाडी, पेडगाववाडी (जुमडा), अंधरवाडीर, डिग्रस वाणी, सिरसम खु, माळसेलू, सिरसम बु., कन्हेरगाव नाका, कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खुर्द, पोतरा, सिंदगी, हातमाली, कुपटी, मालालोगी तांडा, रामवाडी, वसमत तालुक्यातील बाभूळगाव, पळसगाव, पिंपळा चौरे, औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर (संघानाईक तांडा, काळापाणी तांडा, सेवादास तांडा), लक्ष्मणनाईक तांडा, येळेगाव सोळंके, सेनगाव तालुक्यातील जयपूर, सेनगाव, कहाकर खुर्द, सावरखेडा, बटवाडी, कोंडवाडा आदी गावांत हे टॅंकर सुरू आहेत. 

या गावांत टॅंकरच्या ११८ खेपा मंजूर आहेत. आजवर ४ हजार २५४ खेपा झाल्या आहेत. एकूण ४३० खेपा कमी झाल्या आहेत. जिल्ह्यातील ३६३ गावांतील टॅंकरसाठी ४१ आणि टॅंकर व्यतिरिक्त ४०८ विहिरी अशा एकूण ४४९ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com