‘नार-पार’चे पाणी गुजरातला देण्याचा प्रयत्न हाणून पाडू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लखमापूर, जि. नाशिक : महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी आघाडी सरकारच्या काळात आम्ही नार-पार योजना आखली; परंतु गुजरातमधील नेत्यांच्या इशाऱ्यावर खाली माना घालत भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचे पाप करत आहेत. तसा प्रयत्न झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला कडाडून विरोध करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला.

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या कारभाराविरोधात तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. २७) मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्‍वासने देऊन या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर सरकारविरुद्ध हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे.

कोणाला कर्जमाफी मिळाली? युती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री रोज चुकीचे आकडे देत फसवणूक करत आहेत. येथे उपस्थित असलेल्यांपैकी कुणाला तरी कर्जमाफी मिळाली का? असा प्रश्‍न विचारला. तसेच जर कुणाला कर्जमाफी मिळाली असेल, तर त्यांचे ‘मी लाभार्थी’ म्हणून छायाचित्र आपण लावू, असा टोला श्री. तटकरे यांनी सरकारला लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com