उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होतोय

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होतोय
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होतोय

पुणे : दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा उत्तर भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी थंडी कमीअधिक असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  सध्या विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे. ही लाट अजून एक दोन राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरवात होईल. विदर्भातील गोंदिया आणि मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. संक्रांतीनंतर थंडी कमी होण्यास सुरवात झाली होती. परंतु, गेल्या आठवड्यात पुन्हा काही प्रमाणात थंडी परतली होती. मात्र, आता थंडी कमी होण्यास सुरवात झाली असली तरी कमाल तापमानात किंचित वाढ होण्यास सुरवात झाली आहे. थंडीमुळे दुपारी उन्हाचा चटका सुखद वाटू लागला असला तरी सायंकाळी पुन्हा काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. रात्री दहानंतर थंडीत किंचित वाढ होत जाऊन पहाटे किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली उतरत आहे.   कोकणातील मुंबई, रत्नागिरी, भिरा येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत एक दोन अंश सेल्सिअसने घटला आहे. भिरा येथे १५.० अंश सेल्सिअस एवढे किमान तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग व डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे.  मध्य महाराष्ट्रातील दक्षिण कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले. नगर, जळगाव, नाशिक आणि सातारा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घटले. निफाड, नाशिक, जळगाव येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली होता.  मराठवाड्यातील बीड, परभणी येथे थंडीचा प्रभाव अजूनही कायम आहे. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद येथे काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वात कमी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील बहुतांशी सर्वच जिल्ह्यांत थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानाचा पारा आठ अंशांपर्यंत खाली आला आहे. नागपूर, ब्रह्मपुरी आणि गोंदिया येथील किमान तापमान दहा अंशाच्या खाली होते. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्यावर होते.  सोमवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १६.० (-१), अलिबाग १८.४ (१), रत्नागिरी १७.६ (-२), भिरा १५.० (-१), डहाणू १७.० (२), पुणे ११.५, नगर १०.१ (-३), जळगाव ९.० (-४), कोल्हापूर १६.९ (१), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १२.४ (१), नाशिक ९.९ (-१), निफाड ८.०, सांगली १५.३ (१), सातारा १२.९ (-१), सोलापूर १६.७, औरंगाबाद १२.६ (१), बीड १०.३ (-४), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १०.१, परभणी शहर ११.० (-५), नांदेड १४.५, उस्मानाबाद १२.९, अकोला १२.५ (-२),  अमरावती १४.०, बुलढाणा १५.० (-२), चंद्रपूर १३.२ (-२), गोंदिया ८.० (-६), नागपूर ९.३ (-५), वाशीम  १०.६, ब्रह्मपुरी ९.८, वर्धा १०.१ (-४), यवतमाळ १३.४ (-३)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com