जळगाव जिल्ह्यातील शेवया बुरशीप्रकरणी कारवाई का नाही; शिवसेनेचा सवाल

जळगाव जिल्ह्यातील शेवया बुरशीप्रकरणी कारवाई का नाही; शिवसेनेचा सवाल
जळगाव जिल्ह्यातील शेवया बुरशीप्रकरणी कारवाई का नाही; शिवसेनेचा सवाल

जळगाव : जिल्हा परिषदेत शेवयांच्या प्रकरणावरून राजकारण सुरू असून, सर्वसाधारण सभेत दोषींवर फौजदारी दाखल करण्याचा ठराव होऊनही कुठलीही कार्यवाही अजून झालेली नाही. ही कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊ, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या प्रकरणावरून जिल्हा परिषदेत तणातणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

 जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराअंतर्गत झालेल्या शेवयांच्या पुरवठ्यात अनेक ठिकाणी बुरशी आढळली होती. त्याबाबत प्रशासनाने पंचनामे केले होते; परंतु याबाबत पुरवठादार किंवा इतर दोषी यंत्रणांवर कोणतीही कार्यवाही होत नव्हती. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तक्रार केली. काही पदाधिकाऱ्यांनीदेखील हा मुद्दा मांडला. बुरशीयुक्त शेवया आरोग्याला हानिकारक आहेत. त्याबाबत प्रशासन का कारवाई करीत नाही.

दोषींना कोण वाचवित आहे, असे प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले. झालेल्या पंचनाम्यांंच्या आधारावर दोषींवर फौजदारी कारवाईसंबंधी प्रशासन पावले उचलेल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, अजूनही फौजदारीची कार्यवाही झालेली नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी जिल्हा परिषदेत काही पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने जाहीरपणे केला आहे. यासंदर्भात शिवसेना व भाजप यांच्यात तणातणी सुरू असतानाच भाजपमध्येही अंतर्गत वाद उफाळण्याची शक्‍यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com