बोंड अळीवर उपाययोजनांसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. विश्वनाथा

बोंडअळी नियंत्रणाबाबत कार्यशाळा
बोंडअळी नियंत्रणाबाबत कार्यशाळा

नगर  ः कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गतवर्षी मोठे नुकसान झाले. यंदा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी यंत्रणानी सज्ज राहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कापूस सुधार प्रकल्पात शुक्रवारी (ता. ८) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे कापूस बोंड अळी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कृषीचे विभागीय सहसंचालक दादासाहेब सप्रे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधक संचालक डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब भारूड, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, बी. एन. मुसमाडे, आत्माचे उपसंचालक सुरेश जगताप, तंत्र अधिकारी अशोक संसारे, बाळासाहेब नितनवरे, रामदास दरेकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. विश्वनाथा म्हणाले, की जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागला. त्यामुळे यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही याकरिता कृषी विभाग, विद्यापीठाने योजना आखली आहे. यंदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यादृष्टीने यंत्रणानी काम करावे. यंदा कापुस उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

आतापर्यंत बोंड अळी नियंत्रणावर आठ कार्यशाळा झाल्या आहे. गावागावो कार्यक्रम घेतले आहे. कृषी सहायकावर याबाबतची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना वेळोवळी मार्गदर्शन करायचे आहे. जैविक कीड नियंत्रणाबाबत शंभर हेक्‍टरवर प्रकल्प राबवला जाणार आहे. गतवर्षी कमी उत्पादन आलेल्या गावात पीक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, ’’ असे पंडित लोणारे यांनी सांगितले. 

यावेळी डॉ. आर. एस. वाघ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एन. के. भुते यांनी सूत्रसंचालन केले. सोपान मोरे यांनी आभार मानले. प्रारंभी शेतकरी जगन्नाथ मदने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या घडीप्रत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.  

कार्यक्रम दोन तास उशिरा नगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित केलेला शेतकरी मेळावा दोन तास उशिरा सुरू झाला. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नसल्याने प्रमुख पाहुण्यांनाही काही काळ प्रतीक्षा करावी लागली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com