पुणे : गाळपासाठी पाच लाख टन ऊस उभा असलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला संजीवनी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामुळे आता यशवंत कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी अवसायकांनी धडपड सुरू केली आहे.
हवेली तालुक्यातील थेऊर परिसरातील यशवंत कारखान्याचे धुराडे पेटल्यास अनेक गावांची आर्थिक सुबत्ता परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे २०११ मध्ये शेवटचा हंगाम घेत ‘यशवंत’चा बॉयलर थंडावला. त्यानंतर गेल्या सहा हंगामांपासून या कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटलेला नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.