‘यशवंत’चे धुराडे पेटविण्यासाठी अवसायकांची धडपड

यशवंत कारखाना
यशवंत कारखाना

पुणे : गाळपासाठी पाच लाख टन ऊस उभा असलेल्या व गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला संजीवनी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामुळे आता यशवंत कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी अवसायकांनी धडपड सुरू केली आहे. 

 हवेली तालुक्यातील थेऊर परिसरातील यशवंत कारखान्याचे धुराडे पेटल्यास अनेक गावांची आर्थिक सुबत्ता परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे २०११ मध्ये शेवटचा हंगाम घेत ‘यशवंत’चा बॉयलर थंडावला. त्यानंतर गेल्या सहा हंगामांपासून या कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटलेला नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘यशवंत’ सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक घेतली होती. कारखान्याचा हंगाम सुरू करण्यासाठी तसेच थकीत देणी चुकती करण्यासाठी आराखडा तयार करा, अशा सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या आहेत. 
 
‘यशवंत’ला सध्या कोणीही वाली नसल्यामुळे साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी आता या कारखान्यावर अवसायक म्हणून साखर सहसंचालक बी. जे. देशमुख यांची नियुक्ती केली आहे. श्री. देशमुख सध्या या कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी जोरदार नियोजन करीत आहेत.
कारखाना सुरू झाल्यास हवेली, वेल्हा, भोर, पुरंदर भागांतील हजारो शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो.  
 
‘यशवंत’च्या कार्यक्षेत्रात यंदाच्या गाळपासाठी पाच लाख टन ऊस उभा आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ७०० कामगारांचे संसार सांभाळत असलेल्या या कारखान्याकडे प्रतिदिन ३५०० टन गाळपाची क्षमता असलेली यंत्रणा आहे. ३० हजार लिटर्स क्षमतेची डिस्टलरी आहे. याशिवाय २४८ एकर जमीन आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com