यवतमाळ दुर्घटनेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी : मुख्यमंत्री

ज्या कंपन्यांनी रासायनिक घटकांचे चुकीचे मिश्रण बनवले त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी विषारी कीटकनाशकांची विक्री केली त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचा विचार आहे. - देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री
यवतमाळ दुर्घटनेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी : मुख्यमंत्री
यवतमाळ दुर्घटनेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी : मुख्यमंत्री

मुंबई : यवतमाळ येथे कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधा दुर्घटनेची "एसआयटी' (विशेष तपासणी पथक) मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.10) केली. दरम्यान, यवतमाळ येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, की यवतमाळ दुर्घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. याप्रकरणी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी प्राथमिक चौकशी केली. हा चौकशी अहवाल राज्य सरकारला नुकताच मिळाला आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायदा बनवण्याचा विचार केला जाईल.

चायनीज गनच्या वापरामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या गनवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com