राज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती होणार लागू

राज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती होणार लागू
राज्यात ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ कार्यपद्धती होणार लागू

मुंबई : ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी राज्य सरकारने ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ या शासकीय कार्यालयीन कामकाज कार्यपद्धतीस एप्रिलपासून प्रारंभ करणार आहे. प्रकल्पग्रस्त धर्मा पाटील यांंना प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी आपले जीवन द्यावे लागले, या प्रकरणाचा धसका घेतलेल्या राज्य सरकारने अखेर नवी कार्यपद्धती अवलंबिण्यावर भर द्यायचे ठरवले आहे. लोखो नागरिकांना या नव्या कार्यपद्धतीने दिलासा मिळेल आणि हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, अशी अाशा व्यक्त केली जात आहे.  राज्यात “झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल” कार्यपद्धतीचा शासन आदेश राज्य सरकारने गुरुवारी (ता. १५) जारी केला आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यपद्धतीचा स्तर ठरवून देण्यात आला आहे. मंडळ, तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय आणि राज्यपातळीवर झिरो पेंडन्सी संदर्भात कार्यपद्धती आखून देण्यात आली आहे. दर दिवशी प्राप्त झालेल्या संदर्भ आणि प्रकरणावर त्याच दिवशी निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. मंत्रालयातील आत्महत्यांच्या घटनेमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने सामान्यांना भेटा, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना सहकार्य करा, असा शासन निर्णय जारी करून अधिकार्यांना आदेश दिले आहेत.

प्रत्येक कार्यालयाकडे प्राप्त प्रकरणांवर संस्करण करून ऑनलाइन वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयांना देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याखरीज विलंबास प्रलंबित अधिनियम, २००५मध्ये नमूद केलेल्या कालावधीनुसार, प्रकरणे आणि संदर्भ निकाली काढणे बंधनकारक राहणार असून, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्यानंतर्गत ज्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत, त्या सेवांना संबंधित अधिसूचनेनुसार नमूद कालावधी जसाच्या तसा लागू असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.   भेटीकरिता वेळ राखीव... मंत्रालयीन अधिकाऱ्यांना रोज २.३० ते ३.३० ची वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे. उपविभागीय आणि त्यावरील अधिकाऱ्यांना सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ५ लोकांना भेटीसाठी राखून ठेवावा, भेटीच्या वेळा बाहेर बोर्डावर लावाव्यात, असे बजाविण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी १८ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. शासकीय आदेश https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201802151816460007.pdf

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com