जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) गवारीची फक्त दोन क्विंटल आवक झाली. आवक कमी व मागणी कायम यामुळे गवारीला ३२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मागील आठ ते दहा दिवसांपासून गवारीची आवक फारशी नसल्याने दरवाढ झाल्याची माहिती मिळाली आहे.
बाजारात बुधवारी पपईची सात क्विंटल आवक झाली. तिला १३०० रुपये क्विंटल दर होता. पेरूची पाच क्विंटल आवक झाली. पेरुला १८०० ते २५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला. लिंबाची १७ क्विंटल आवक झाली. त्याला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर होता. बोरांची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर होता.
कोथिंबिरीची १५ क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला ६०० ते ११०० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. कारल्याला २८०० रुपये क्विंटल दर होता. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. मिरचीला १२०० ते २२०० रुपये तर सरासरी १६०० रुपये क्विंटल दर होता. पालकची तीन क्विंटल आवक झाली. पालकाला १२०० रुपये क्विंटल दर होता.
टोमॅटोची ३१ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथी जुड्यांची १८ क्विंटल आवक झाली. तिला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. वाटाण्याची चार क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला.
कांद्याची आवक सुमारे २५० क्विंटल झाली. कांद्याला सरासरी तीन हजार रुपये क्विंटल दर होता. बटाट्यांची आवक सुमारे २०० क्विंटल झाली. बटाट्याला ३५० ते ६०० रुपये तर सरासरी ४५० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.