जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारीची आवक कमीच आहे. महिनाभरापासून आवक कमी असून, बुधवारी (ता.२७) दोन क्विंटल आवक झाली. गवारीला एकच ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
गवारची लागवड रब्बीत फारशी नसते. जामनेरातील पहूर, पाळधी, शेंदूर्णी, पाचोरा तालुक्यातील उत्राण व गिरणा नदीकाठावरील काही गावांमध्ये गवारीची लागवड केली जाते. कूस असलेल्या गवारीला अधिकची मागणी आहे. तिचे लिलावही लगेच होत आहेत. मागील आठवड्यातही प्रतिदिन आवक फक्त दोनच क्विंटल होती, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.
बाजार समितीत भरीताच्या वांग्यांची बुधवारी ५१ क्विंटल आवक झाली. त्यास १३०० ते १६०० रुपये क्विंटल दर मिळाला. अद्रकची (आले) ५३ क्विंटल आवक झाली. त्याला ११०० ते २३०० रुपये क्विंटल दर होता. कोथिंबिरीची ११ क्विंटल आवक झाली. तिला ६०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथीची १० क्विंटल आवक झाली. मेथीला ५०० ते ९०० रुपये क्विंटल दर होता. कारल्याची दोन क्विंटल आवक होती. कारल्याला २१०० रुपये क्विंटल दर होता.
कोबीची ११ क्विंटल आवक झाली. कोबीला ६०० ते ११०० रुपये क्विंटल दर मिळाला. पालकची चार क्विंटल आवक झाली. पालकाला ११०० रुपये क्विंटल दर होता. मुळ्याची सहा क्विंटल आवक झाली. त्याला १००० रुपये क्विंटल दर होता. गाजरांची १३ क्विंटल आवक झाली. त्याला १७०० ते २५०० रुपये क्विंटल दर होता.
हिरवी मिरचीची ९५ क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते २१०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. त्याला २१५ ते ४१५ रुपये क्विंटल दर होता. लाल कांद्याची ८५० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला १५०० ते २८५० रुपये क्विंटल दर होता. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्विंटल दर होता. बोरांची २५ क्विंटल आवक झाली. बोराला १२०० रुपये क्विंटल दर होता. वाटाण्याची ६० क्विंटल आवक झाली. त्याला १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर होता.