समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : भाजप सरकारसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गासाठी १०० टक्‍के जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. २३ हजार ५०० प्रकल्पग्रस्तांकडून राज्य सरकारने ७ हजार ५०० कोटी रुपये मोजून महामार्गासाठी एकूण ८ हजार ३११ हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण केले आहे.

नागपूर-मुंबईदरम्यान ७०० किलोमीटर लांबीच्या राज्य समृद्धी महामार्गात जमीन अधिग्रहणाच्या अडचणी नाशिक पट्ट्यामध्ये आल्या होत्या. या महामार्गातले जमीन अधिग्रहणाचे सर्वच प्रश्‍न सोडवण्यात आले असून, जमिनीचे १०० टक्‍के अधिग्रहण करण्यात आले आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणी कामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकामचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी दिली. 

समृद्धी महामार्गात जमीन अधिग्रहण हा महत्त्वाचा प्रश्‍न होता, मात्र लोकांच्या मागणीनुसार योग्य मोबदला देण्याचे धोरण राज्य सरकारने घेतल्याने सर्व जमीन ताब्यात आली असल्याचा दावा सौनिक यांनी केला. समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे या महत्त्वाच्या दहा जिल्ह्यांमधून जात आहे. ५५ हजार ३३२ कोटींच्या या महामार्गाचा आढावा नुकताच घेण्यात आला, ज्यामध्ये समृद्धी महामार्ग २०२१ च्या सुरवातीलाच वेळेच्या आत पूर्ण होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com