हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले
हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

जळगाव : मध्य प्रदेश व इतर भागांत पाऊस झाल्याने खानदेशची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे सहा दरवाजे रविवारी (ता. २४) मध्यरात्रीपासून पूर्णतः उघडे करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची स्थिती मात्र जेमतेम आहे. तर काही प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. हतनूर धरण भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्‍यांजवळ आहे. त्यात सोमवारी सहा टक्के जलसाठा होता. मध्य प्रदेशात या नदीचा उगम असून, नदीत पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे. मागील आठवड्याच्या सुरवातीलाही धरणाचे दोन दरवाजे उघडे होते. धरणातील प्रवाह वाढतच असल्याने सहा दरवाजे उघडण्याचा निर्णय संबंधित प्रशासनाने घेतला आहे. या धरणाच्या सांडव्यातून ३१३३ क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणीपातळी २०८ मीटर एवढी आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १५.३० द.ल.घ.मी. एवढा झाला आहे.

हतनूरच्या क्षेत्रात पाच मिलिमीटर पाऊस

हतनूर धरणाच्या क्षेत्रात रविवारी (ता.२४) पाच मिलिमीटर पाऊस झाला. हतनूर धरणात पाण्याचा प्रवाह आहे, परंतु जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची स्थिती मात्र बिकट आहे. गिरणा धरणात  टक्के, वाघूरमध्ये ३४.९६ टक्के जलसाठा आहे. तर अग्नावती, बहुळा, मन्याड, अंजनी या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. रावेर तालुक्‍यातील सुकी धरणातील साठा काहीसा वाढला असून, तो ३५ टक्के एवढा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com