ग्रामपंचायत निवडणूक स्वाभिमानी स्वबळावर लढणार ः राजू शेट्टी

raju shetty
raju shetty

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत मोदी सरकारने शब्द न पाळल्यानेच आम्ही पाठिंबा काढून घेतला. आता आगामी ग्रामपंचायत निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावरच लढेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या एका सभेत श्री. शेट्टी बोलत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची चळवळ सुरूच राहणार आहे. जिल्हा परिषदेत असणाऱ्या युतीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले. सध्या तरी जाहीर झालेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुका संघटना स्वबळावर लढवेल. तशा सूचना कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत. यानुसार कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, असे श्री शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com