नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र चौधरी या उच्चशिक्षित तरुणाने जिरॅनियम, पाल्मारोजा, लेमनग्रास व वाळा या चार सुगंधी वनस्पतींद्वारे शेतीचा वेगळा मार्ग जोपासला. एक पाऊल पुढे टाकून वनस्पतींपासून तेलनिर्मितीही सुरू केली आहे. उद्यमशीलता, तांत्रिक ज्ञान व बदलत्या शेती व बाजारपेठेचे भान यांचा संगम साधून राज्यासाठी उपक्रमशीलतेचा आदर्श उभारला आहे. नगर जिल्ह्यातील आंभोळ हे अकोले तालुक्यातील दुर्गम गाव. येथील मच्छिंद्र चौधरी यांचे कुटूंब सदस्य पूर्वी फळबाग, भाजीपाला आदी पारंपरिक पिके घेत. त्यातून अर्थकारण मात्र आकारास येत नव्हते. कुटुंबातील मच्छिंद्र ‘एमएस्सी केमिस्ट्री तर धाकटे भाऊ अनिल "एमए' झालेले आहेत. मच्छिंद्र यांना बावीस वर्षांचा मुंबईत सांडपाणी व्यवस्थापन कामांचा (वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) अनुभव आहे. त्यांची या क्षेत्रातील कंपनीही आहे. आपल्या कंपनीतील सांडपाण्याला उग्रवास येत असताना मुंबई स्थित एका कंपनीच्या प्रकल्पातील सांडपाण्याला मात्र सुगंध येत असल्याचे त्यांच्या निरीक्षणास आले. त्यामागील कारण जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. सुगंधी वनस्पतीच्या शेतीला सुरवात या विषयातील अधिक अभ्यास करताना सुगंधी तेलनिर्मितीची दिशा मिळाली. देशातील सुगंधी तेलाची मागणी, बाजारपेठ व अर्थकारण यांचा अभ्यास मच्छिंद्र यांनी सुरू केला. मग पारंपरिक शेतीत अडकून राहण्यापेक्षा सुगंधी वनस्पतींची शेती आणि तेलनिर्मितीकडे वळण्याचे त्यांनी ठरवले. उद्यमशीलता त्यांच्याकडे होतीच. त्यादृष्टीने व्यवसायाचा आराखडा तयार केला. आपल्या भागातील जमीन, हवामान व पाणी यांचाही विचार त्यात होता. असा साकारला प्रकल्प सुरवातीचे प्रयत्न १) पहिली लागवड - चार वर्षांपूर्वी दीड एकरांवर जिरॅनियम तर लेमनग्रास, वाळा, पाल्मारोजा यांची एकूण अर्धा एकरावर पथदर्शक लागवड २) मुंबई, लखनौ आदी भागांतून रोपे आणली. सुरवातीला उत्पादन घेण्यात तांत्रिक अडचणी आल्या. अनुभवातून शिकत मार्ग काढला. ३) बाजारपेठेतील मागणी व आपल्या कामाचा आवाका लक्षात घेत लागवड क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. ४) पहिल्या वर्षी सुगंधी तेल काढण्याचे प्रात्यक्षिक घेतले. ते जमल्यानंतर दोन वर्षांपासून त्यात नियमितता ठेवली आहे.
उत्पादन जिरॅनियम
पाल्मारोजा
लेमनग्रास (गवती चहा)
वाळा
सुगंधी तेलनिर्मिती
बाजारपेठ मच्छिंद्र म्हणाले, की सध्या मुंबई येथील ‘परफ्युम व कॉस्मेटीक’ क्षेत्रातील एका कंपनीला करार पद्धतीने तेलांचा पुरवठा केला जात आहे. सुगंधी तेलांना बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तेलाचा ‘फ्रॅग्रन्स’ व ‘फ्लेवर’ यांना मोठे महत्त्व आहे. सहकार्य मच्छिंद्र यांचे बंधू अनिल यांचे मोठे पाठबळ आहे. नातेवाईक युवराज कुटे शेतीचे व्यवस्थापन पाहतात. बीएस्सी ॲग्री , एमबीए पर्यंत त्यांचे शिक्षण झाले अहे. त्यांचे मंचर (जि. पुणे) येथे कृषी सेवा केंद्रही आहे. शेतकऱ्यांच्या भेटी चौधरी यांच्या या शेतीला आत्तापर्यंत राज्यासह देशभरातून असंख्य म्हणजे हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. त्यांना माहिती देण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. काड्यांपासून कंपोस्ट खत तेल काढणी झाल्यानंतर काड्यांपासून वर्षभरात सुमारे वीस टन सेंद्रिय खत तयार होते. आपल्याच शेतात त्याचा वापर होतो. शेतीतील ठळक बाबी
आगामी नियोजन
मच्छिंद्र म्हणतात
संपर्क- मच्छिंद्र चौधरी - ९३२२४०५५८१ अनिल चौधरी - ८८८८६८२३८८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.