जैव रासायनिक प्रक्रियेमुळे फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. या प्रक्रियेमध्ये अन्नपदार्थ सडणे, त्यास घाण वास येणे याचा समावेश होतो. असे अन्नपदार्थ सेवन केल्यास विषबाधा होऊ शकते.
अन्नविषबाधेची कारणे जैविक घटकामुळे अन्नविषबाधा यामध्ये प्रामुख्याने बुरशी, जिवाणू, विषाणू इत्यादीचा समावेश होतो. एखादा सूक्ष्मजंतू पोटात गेल्यामुळे होऊ शकते. यामुळे होणारी विषबाधा सर्वांत हानिकारक असते. त्यामुळेच अन्न हाताळतेवेळी, साठवतेवेळी आणि शिजवतेवेळी निष्काळजीपणा केल्यास जिवाणूमुळे अन्न दूषित होते आणि विषबाधेचे प्रमाण वाढते, त्यामुळे स्वच्छता राखली पाहिजे.
जिवाणू आणि विषाणूमुळे अन्नविषबाधा बॅसिलस सिरस, क्लोस्ट्रोडीअम, इर्सेनिया यामुळे विषबाधा होते. त्यासाठी अन्न काळजीपूर्वक शिजवणे अावश्यक अाहे. अन्न हाताळताना हात स्वच्छ धुणे, भांडी, भाज्या, फळे स्वच्छ धुणे. अन्नपदार्थ, फळे अाणि भाज्यांची नियंत्रित तापमानावर साठवण करावी. वैयक्तिक स्वच्छता राखावी. विषाणू हे परोपजीवी असतात, त्यामुळे कावीळ सारखे रोग होतात.
कीटकनाशकांमुळे विषबाधा कीड अाणि रोग नियंत्रणासाठी पिकावर कीडनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे पिकावर कीडनाशकाचे अवशेष राहतात. त्यामुळेही अन्नपदार्थ विषारी बनतात.
भेसळयुक्त अन्नपदार्थ जास्त नफा मिळविण्यासाठी अन्नामध्ये भेसळ केली जाते. दुधात व दुग्धजन्य पदार्थांत मैद्याची, साखरेची, मिठाची, पाण्याची भेसळ केली जाते. तसेच हळद पावडर, मिरची पावडर, चहा पावडर यातसुद्धा भेसळ केली जाते. गव्हाच्या पिठात खडूची, तुपामध्ये वनस्पतीची तर मधामध्ये साखरेची भेसळ केली जाते.
प्रतिबंधात्मक उपाय
संपर्क : चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७ (सौ. के. एस. के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.