उपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी वापरण्यास मिळते. ३० टक्के पाणी बाष्पीभवनाने हवेत जाते. येत्या काळात पाणीटंचाई लक्षात घेता जागतिक तापमान वाढीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. जंगल परिसंस्थेच्या अभ्यासाअंतर्गत अनेक उपविषयांचा अभ्यास केला जातो. यामध्ये आर्द्रता चक्राचा समावेश आहे. पृथ्वीवरील उपलब्ध पाण्याचे वेगवेगळ्या जागेतील प्रमाण दिले आहे. ते अभ्यासण्यासारखे आहे. हे प्रमाण १०१७ किलो ग्रॅम या परिमाणात आहे.
वरील माहितीवरून एकूण पाण्याच्या तुलनेत पृथ्वीवरील वनस्पती व प्राण्यासाठी किती पाणी सर्वसाधारण उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. दोन ध्रुवावरील पाणी जर पूर्णपणे विरघळून गेले तर त्या पाण्याचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ५० मीटर (१६२ फूट) इतक्या उंचीने पृथ्वी झाकली जाईल. जागतिक तापमान वाढीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. याला कारण ध्रुवावरील थोडे जरी बर्फ विरघळले तरी समुद्राकाठची अनेक मोठी शहरे पाण्यासाठी जातील, असे सांगितले जाते, याची अंशतः प्रचिती लक्षात येते.
संपर्क : प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ ( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.