भारताला फळे अाणि भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहे. भारतातून कांदा, भेंडी, कारले, हिरवी मिरची, अळिंबी आणि बटाटे या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. तर फळांमध्ये द्राक्षे, केळी, डाळिंबाची निर्यात केली जाते. भारतात वैविध्यपूर्ण हवामानामुळे फळे आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. चीननंतर फळे आणि भाजीपाला उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डानुसार, २०१४-१५ मध्ये भारतात ८६.६०२ दशलक्ष मेट्रिक टन फळे आणि १६९ .७८ दशलक्ष मेट्रिक टन भाज्यांचे उत्पादन झाले. ६.११० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची तर ९.४२९ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड झाली. त्यामुळे भारताला फळे अाणि भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहे.
भारतातून कांदा, भेंडी, कारले , हिरवी मिरची, अळिंबी आणि बटाटे या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते, तर फळांमध्ये द्राक्षे, केळी, डाळिंबाची निर्यात केली जाते. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्राने घेतलेला पुढाकार, आपेडाची मदत अाणि एकात्मिक काढणीपश्चात तंत्रज्ञानामुळे निर्यातीला प्रात्साहन मिळत अाहे. त्यामुळे फळे, भाजीपाल्याची निर्यात अजून वाढविणे शक्य अाहे.
फळे आणि भाजीपाल्याचे मुख्य अायातदार देश यूएई, बांगलादेश, मलेशिया, नेदरलंड, श्रीलंका, नेपाळ, यूके, सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि कतार.
कांदा
इतर भाज्या
आंबा
द्राक्ष
(संदर्भ ः अपेडा)
संपर्क ः बालाजी रुद्रवार, ९०२८६२३६६८. (अन्न व्यापार व व्यवसाय व्यवस्थापन विभाग, के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.